स्थान: मानंतवाडीपासून पूर्वेस सुमारे 20 कि.मी, वायनाड जिल्हा, उत्तर केरळ
वायनाड जिल्हा पश्चिम घाटामधील उंच डोंगराळ पठारांवर वसला आहे. येथे इ.स.पू. सुमारे १० शतकांपासून मानवी संस्कृती अस्तित्वात होती; असे इतिहासकारांचे म्हणणे आहे.
नंतरच्या काळात मानवी वस्ती अतिशय विरळ होत गेलेल्या या बाह्य जगाचा स्पर्श न झालेल्या भागामधे बेगूर वसले आहे. केरळच्या अतिशय रम्य वनभागांपैकी एक वन्यक्षेत्र आहे. या परिसरात वन्य पशू व वनस्पतींच्या विविध जाती आढळून येतात, तसेच निसर्गप्रेमी व्यक्तींसाठी ही एक अतिशय उपयुक्त जागा आहे.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेल्वेस्थानक: कन्नूर जिल्ह्यामधील थलासेरी, मानंतवाडीपासून सुमारे 80कि.मी.
- जवळचा विमानतळ: कारीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोझिकोडे, सुमारे 106 कि.मी.