तुम्ही या हिरव्यागार, सुंदर अशा वाग्मणला कधी भेट दिली आहे का? आता तुम्ही असा विचार करत असाल कि इतर हिरव्यागार, निसर्गरम्य ठिकाणांपेक्षा येथे काय वेगळे आकर्षण असेल? ”पण वाग्मण हे अन्य हिरव्यागार प्रदेशांपेक्षा निश्चितच वेगळे आहे.तुम्ही येथे हिरव्यागार पर्वत टेकड्या, मखमली कुरणे, पर्वतावरील थंडगार वारा यांचा उत्तम आस्वाद वाग्मण सोडून अन्य कोणत्याही ठिकाणी लुटता येणार नाही. धार्मिक रहस्यवाद आणि युरोपियन परंपरा यांचे रोचक मिश्रण याखेरीज अन्य कोठेही पहावयास मिळणार नाही.
जीवनातील इतर सुंदर गोष्टींबरोबरच वाग्मण्च्या गोष्टी ह्या केवळ ऎकण्याने किंवा वाचून समजायच्या नसून तुम्ही त्या केवळ स्वानुभवानेच समजू शकता. यासाठी तुम्ही असे करा कि एखाद्या वाहनाद्वारे सरळ इडुक्की जिल्यात जायची व्यवस्था करा आणि तेथून वाग्मणला पोहोचा. एकदा का वाग्मणला पोहोचलात कि आपली पादत्राणे काढा आणि आपले डोळे बंद करून वाग्मणला केवळ ऎकण्याचा प्रयत्न करा.
आणि जेव्हा तुम्ही येथील रहस्यमय वातावरणातून पुढे जाल तेव्हा आपल्याला तीन टेकड्यांचे दर्शन घडेल; त्या आहेत-थंगल टेकडी, मुरुगन टेकडी आणि कुरिसुमला टेकडी. या टेकड्या अनुक्रमे हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन समुदायांची धर्मस्थळे आहेत.
आणि कुरिसुमला येथील भिक्षूंचे डेअरी फ़ार्म पाहण्यास अवश्य चुकवू नका.
येथे पोहोचण्यासाठी:
रस्त्याद्वारे: मळ्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पीरमेडपासून 25 किमी दूर.
- जवळचे रेल्वे स्थानक: पीरमेडपासून साधारण 75 किमी लांब असलेले कोट्टयम
- जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ,पीरमेडपासून साधारण 150 किमी लांब.