हा व्हिडिओ तूप भात कसा बनवायचा ते दाखवेल.
सामग्री
- बिरयाणी भात - 2 कप
- तूप - 5 ते 6 चमचे
- काजू - 1/2 कप
- लवंग - 4 ते 5
- ठेचलेली मिरी - 4 ते 5
- बेदाणे - ¼ कप
- ठेचलेले आले - 1 चमचा
- ठेचलेली लसूण - 1 चमचा
- लिंबाचा रस
- कांदे (तुकडे करून) - 2
- तमालपत्र - 2
- वेलची - 4
- दालचिनी - 2 काड्या
- चिरलेली कोथिंबीर ¼ कप
- मीठ - चवीनुसार
- पाणी - 31/2 कप
कृती
तांदूळ धुवा आणि पाणी काढून बाजूला ठेवा. कढईत तीन चमचे तूप गरम करा. काजू घालून तांबूस होईपर्यंत परता. काजू काढून घ्या. बेदाणेही असेच परता.
कढईत थोडे जास्त तूप तापवा. मोठे कांदे घाला आणि मीठ घाला. परता आणि तांबूस रंग येईपर्यंत परता. परतलेले काजू आणि बेदाणे ठेवलेल्या ताटलीत काढा.
थोडे अधिक तूप घ्या आणि मोठ्या भांड्यात तापवा. लवंगा घाला मग वेलची, ठेचलेली मिरी आणि आलं-लसूण पेस्ट घाला. चांगले परता. यात मोठ्या कांद्याचे तुकडे घाला थोडेसे परता. आता तुम्ही तांदूळ घाला जो धुवून बाजूला ठेवला होता. चांगले मिसळा आणि मीठ घाला. आता कोथिंबीर घालून पुन्हा परता. तमालपत्राचे तुकडे घाला आणि तांदूळ बुडेपर्यंत पाणी घाला. हलके परता आणि भांड्यावर झाकण ठेवा. पाच मिनिटे शिजवा.
झाकण काढा आणि थोडा लिंबाचा रस घाला. चांगले मिसळा.
काजू, बेदाणे, तळलेला कांदा घाला आण तूप भात गरमागरम वाढा.